।। दास-वाणी ।।
निंदे ऐसे नाहीं दोष ।
ते मज घडले कीं विशेष ।
माझे अवगुणीं आकाश ।
बुडों पाहे ।।
नाही वोळखिले संत ।
नाही अर्चिला भगवंत ।
नाहीं अतित अभ्यागत ।
संतुष्ट केले ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०८/११-१२
प्रपंचातच गुंतलो ही मोठी चूक झाली.
हे ज्याला नीट कळले तो मुमुक्षु.
व्यवहारामधे राहून अनेकांची निंदा आयुष्यभर
करत राहिलो. खर तर परनिंदा हे घोर पातक
मी कायमच यथेच्छ करत राहिलो.
याव्यतिरिक्त माझे इतके अवगुण आहेत,
की त्यामधे आकाशही बुडून जाईल.
सुख समृद्धीमधे डुंबत असताना कधी
संत सज्जनांचे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्नही
केला नाही.त्यांना मानसन्मान देणे तर दूरच.
भगवंताची रोजची पूजाअर्चाही कधी यथासांग
हातुन घडली नाही.
अतिथी म्हणजे बोलावलेला पाहुणा,
अभ्यागत म्हणजे अचानक आलेला पाहुणा.
अशा दोघांचेही स्वागत, आदरातिथ्यही कधी मनापासून
केलेच नाही.जे केले ते उपकाराच्या भावनेने केले.
ऐषारामात आयुष्यभर लोळूनही आत्मिक समाधान
असे कधी लाभलेच नाही.
त्यासाठी वेगळाच मार्ग शोधावा
लागेल हे ज्याला उमगले तो मुमुक्षु !
बद्धापेक्षा निश्चित उजवा.
मुमुक्षुलक्षण समास.
Verified Ayurveda Physicians
Ayurveda Experts Online
Connect with trusted Ayurvedic doctors and Panchakarma specialists across Mumbai, Navi Mumbai, Thane, Dombivli, Kalyan, Ambernath, Badlapur, Karjat & Panvel.
No doctors match your search — try a different name, specialty or city.